दि, १५ फेब्रुवारी २०१६ च्या लोकसत्ता मधील अग्रलेख - 'अतिशहाणे वि. अर्धवट' यास उत्तर -
लेखाची लिंक - http://www.loksatta.com/aghralekh-news/police-arrest-jnu-students-union-president-kanhaiya-kumar-3-1202472/
उत्तर -
१. जर काश्मिरी तरुणांमध्ये अफजल जर का नायक असेल तर ते तरुण देखील तेवढेच देशद्रोही म्हणावयास हवे, केवळ काश्मिरी आहेत म्हणून नाही तर देशभरात कुठेही असे तरुण असतील तर ते देशद्रोहीच आहेत कारण देशाच्या महत्वाच्या तश्या संसदेवर त्याने केलेल्या हल्ल्याला हे समर्थनच समजावे.
२. फाशी दिली जात आहे हे घरच्यांना सांगायचे का नाही ह्याच्या वर जर विचार केला तर दोन्ही बाजूंनी विचार व्हायला हवा, घरच्यांना माहित होते कि तो असे काही तरी करण्यात गुंतला आहे, त्यांनी वेळीच पोलिसांना सरकारला सावध करावयास हवे होते, जबाबदारी दोन्ही कडे असते. आतंकवाद संपवण्याची आणि तो तयार होऊ देऊ नये याची सुद्धा.
३. राजीव गांधी यांचे मारेकरी बंदिवानाच राहिले आणि १४ वर्षांनी अफजल ला फाशी दिली हे केवळ राजकारणाचे फळ आहे आणि याला जेवढे राजकारणी तेवढेच सुज्ञ (?) नागरिक पण जबाबदार आहेत हे लक्षात घ्यायला हवे. मोठ्या प्रमाणात माध्यमे देखील जबाबदार आहेत कारण 'कशाला एखाद्या समाजाच्या वाकड्यात शिरा' हाच नेहमी दृष्टीकोन ठेवला जातो हे सर्वथा चुकीचे.
४. एखादा नागरिक आतंकवादी घोषित झाल्यावर त्याला 'हुतात्मा' म्हणणे जेवढे गैर तेवढेच ते छापून आणणे पण गैर आहे, अप्रत्यक्षरीत्या
आपण दहशतवादी कारवायांचे समर्थनच करत आहोत.
५. आपण सार्वजण सर्जनशील नागरिक आहोत, त्यामुळे कुणाचीही शैक्षणिक पात्रता न काढून पदाला मान देणे हेच उचित. त्या पदावर जी व्यक्ती आहे ती जर पदाला न्याय देऊ शाकत नसेल तर तसे चुका दाखवून सांगावे. नाही तर शैक्षणिक दृष्ट्या अपात्र ठरवले जाउन पण स्टीव जॉब्स, बिल गेट्स जन्माला आले आहेत. त्यामुळे ज्याने त्याने आपली आपली पायरी ओळखावी व वागावे.
६. नथुराम ची कृती चूकच, त्याने गांधीजींचे राष्ट्रपती पण काही कमी होऊच शकत नाही. पण अफजलची कृती व नथुराम ची कृती यातला फरक लक्षात न घेत त्याचा संदर्भ इथे देणे हेच अविवेकी लक्षण म्हणावयास हवे. कुणाचे कृत्य निरपराध लोकांना, अविवेकी वृत्तींनी, समाजात तेढ निर्माण करणारे, मनामध्ये धार्मिक आकस ठेवून होते हा विचार करावयास हवा. केलेल्या कृत्याची जबाबदारी व समर्थन करण्यास दाखवलेली नैतिक तयारी कुणाची होती ह्या गोष्टींचा विचार संर्वांनी करावयास हवा.
७. सर्वात शेवटी जे एन यु मधील घोषणा ऐका म्हणजे गांभीर्य लक्षात येईल तरी नाही आले तर दरवाजा ठोठावल्या जाण्याची वाट पहा.